Thursday, March 3, 2011

तुझ्याविना..............



खुप बोलायचय तुझ्याशी तू परत आल्यावर
पटवून द्यायचय तुला किती उणीव भासली तू गेल्यावर
लवकर ये परत तू , आता कुठेही जाऊ देणार नाही तुला
इतकी आठवण आली तुझी , तू एकदा तरी आठवलेस का मला !

लवकर ये परत तू , तुला डोळे भरून पहायचय
लटके लटके रागावून स्वत:लाच मनवुन घ्यायचय
तुझ्या विरहाचे शल्य क्षण क्षण बोचतय
शिरून मिठीत तुझ्या खुप खुप रडायचय !

हे दुराव्यातिल दिवस मला खुपच खायला उठले
तुझ्याविना मी किती अधूरी , माझं मला कलुन चुकले !

No comments: