Tuesday, December 7, 2010

कधी काळी तुझ्यावर....


कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची
बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.

कधी काळी मी तुझ्यावर मरत होतो
आता खरोखर मरण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती मरणं आजमवण्याची
बघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.

कधी काळी माझ्या कविता हसत होत्या
आता कवितांवर रडण्याचे दिवस आलेत
कागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हते
आज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.

कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतो
आज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेत
तुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेत
बघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचे दिवस आलेत.

आठवण


आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

बोलण्यासारखे खुप आहे


बोलण्यासारखे खुप आहे, सांगण्यासारखे काहीच नाही;
करण्यासारखे खुप आहे, होण्यासारखे काहीच नाही.....

कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे, दुखण्यासारखे काहीच नाही.....


उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर, बघण्यासारखे काहीच नाही.....

तुला नेहमीच वाटत असेल, मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे, कळण्यास अवघड काहीच नाही.....

माझ्या नेत्रांतील आसवांची, तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत, नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत

रोज तिथे एकांतात रडतो मी...


रोज तिथे एकांतात रडतो मी...
रडायचे नाही म्हणुन खुप अड़लो मी
विसरून जाइन तुला समजून किती रडलो मी
का तूला आठवू... हाच विचार करतो मी
अळव्यावरच्या थेम्बा प्रमाने क्षण क्षण मरतो मी...

नाही कधी जाणार आपण भेटायचो जिथे
मनात माझ्या रोज ठरवतो मी
तुझी अनुपस्तिथि असल्याने जीवनात
रोज तिथे एकांतात रडतो मी...

नको दिसावा तुझा चेहरा
रोज देवास पाया पडतो मी
पाकिटात्ला तुझा फोटो फाड़तान्ना
गलात्ल्या त्या खलीवर रडतो मी...

एकपण वस्तु तुझी का ठेवावी जवळ
म्हणुन कपाटातल्या सरव्या वस्तु काढतो मी
प्रत्येक वस्तु एकदा ह्रुदयाला लाउन
मुक्त कंठाने रडतो मी...

तू कूठेही असलीस


तू कूठेही असलीस

तरी माझ्या जवळ आहॆस

तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे

फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही

माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆ

एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही

एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही

मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी

पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही

मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाही

मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपली

मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं

कारणं आज मी जरी हरलो पण

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस

तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे

फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही

माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस

एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही

एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही

मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी

पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही

मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस

मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस

मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं

कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस

Monday, December 6, 2010

कुठे मी चुकायचो .


तु कितीही उशीरा आलीस
तरी वाट पहायचो
तुझ्या मोकळ्या केसात
जिवाला गुंतवायचो..
जरा सांगशिल का ?
कुठे मी चुकायचो ..

तु हसलीस की ह्सायचो
तु रुसलीस की रुसायचो
प्रत्येक वेळी हार मानुन
मीच तुझी समजुत काढायचो ..
जरा सांगशिल का ?
कुठे मी चुकायचो ..

तु गाजवायचिस हक्क
मी कुरबुरत नसायचो ..
तुझ्या गालावरच्या खळीसाठी
सदा धडपडायचो..
जरा सांगशिल का ?
कुठे मी चुकायचो ..

तुझा वाढदिवसही तु विसरायचीस
मी आठवण करायचो..
तुझ्या प्रत्येक गोष्टीत
आवर्जुन असायचो...
जरा सांगशिल का ?
कुठे मी चुकायचो ..

मला आठवत नाही कधी
तुझ मन दुखवन्यासारख वागलो
तुझी बेमर्जी होऊन
क तुला मुकलो...?
जरा सांगशिल का ?
कुठे मी चुकायचो ..

जरा सांगशिल का.....का का का ?

दोन जखमा....


तिने दिलेल्या दोन जखमा..........
तिने दिलेल्या दोन जखमा
एक ओठावर दुसरी काळजात होती
पहीली कधीच सुकुन गेली
दुसरी मात्र कीचांळत होती........

खरतर यात चुक तीची नाही
मीच चुक करून फ़सलो
ती ओठावर असायची
मी काळजात रोवुन बसलो........

आता आयुष्य सरतय
जखमांवर फ़ुंकर घालण्यात
आठवणीच मीठ चोळल की
स्वप्नं डोळ्यातून ओघळतात ...........

मी विसरायचा प्रयन्त करतोय
पण जखंमा काही भरत नाही
तीला जिवनातून वजा केल्यावर
शिल्लक काहीच उरत नाही ..........

Sunday, December 5, 2010

कधी कधी येते का ग माझी आठवण......


कधी कधी येते का ग माझी आठवण................
आठवणी त्या गेल्या वाहून का तुझ्या ग अश्रू मधून
कि आठवतो पुसट पुसट चेहरा माझा अजून

कधी कधी येते का ग माझी आठवण................
आठवतात का तुला कधी ते क्षण...................

घालवले जे सोबत आपण त्या क्षणांची ग
आणि घालवू शकलो नाही क्षण जे सोबत

कधी कधी येते का ग माझी आठवण................
आठवतात का तुला कधी ते क्षण...................

पुढ्यात ताट आणि मनात येतो का माझा विचार
विचारात त्या लक्ष न लागे कधी मग जेवणावर
जेवताना ग कधी तो घास अडे का ओठांवर
आणि डोळ्यातून वाहते का ग अश्रूंची धार

कधी कधी येते का ग माझी आठवण................
आठवतात का तुला कधी ते क्षण...................

फिरता फिरता थांबतेस का कधी त्या जागी येऊन
ज्या ठिकाणी कधी भेटायचो आपण लपून छपून
कधी प्रेम तर कधी भांडण आपली अधून मधून
तुझी नजर चहू ओर कोणी बघेल म्हणून

कधी कधी येते का ग माझी आठवण................
आठवतात का तुला कधी ते क्षण..........

माझी आठवण येते का?


बघ,
माझी आठवण येते का?
अन तुझ्या डोळ्यात पाणी दाटत का?
अन,
मग आठवते का?
निळ्याशार समुद्रातील आपली भेट...
बघ जमल तर...
आठवलस ना तर आठवेल तुला,
लाटेकडे पाहून भिजलेल तुझ मन,
मनातील घालमेल अन मग माझी मिठी,
बघ जमल तर...
आठवून बघ तुझ्या डोळ्यातील पाणी,
शहारलेल अंग,कापणारे ओठ,
त्या नजरेने बरच काही सांगून गेलीस,
मग मलाही आठवेल...
माझ्यासाठी आलेल खोट हसू तुझ्या ओठी,
क्षणात लाटांवर स्वर तू,
माझा हात हातात घेउउन बहरणारी तू,
सहज चुंबन घेवून गेलीस,
पहिल्या प्रेमाचा पहिला नजराणा देवून गेलीस,
पुन्हा भेटशील...
तेव्हा दोघही विसरू सगळ जुन,
नात्याची वीण घट्ट विणू,
मग परत बाय म्हणताना,
माझ्याही डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम दाटेल.

मला प्रेम जमलेच नाही.......!


मला प्रेम जमलेच नाही.......!

हो मला प्रेम कधी जमलेच नाही
तिच्या शिवाय मन माझ कशात रमलच नाही!१!

माझ्या मनात
सारखा तिचाच विचार
तिच्या, मात्र मित्रांशी
फोनवर गप्पाच फार!२!

तिला हसवण्यासाठी करायचो
मी जीवाचे रान,
ती म्हणते कशाला देतोस
मला फुकटचा त्राण!३!

तिला खरचटले तरी
व्हायचा हृदयावर घाव,
ती म्हणते कशाला आणतोस
चेहऱ्यावर काळजीचा आव!४!

फोन करायचो तिला
वाटायची तिची काळजी,
ती म्हणते परीक्षा असून फोनवर बोलतोस
असा कसा तू निष्काळजी!५!

तिला सांगायला गेलो
माझे आहे तुझ्यावर प्रेम,
ती म्हणते तुझे नाही का
आयुष्यात कोणते aim!६!

तिला वाढदिवसाला भेटायला गेलो
भर उन्हात तापत,
ती म्हणते, मी मित्राच्या
घरी आहे केक कापत!७!

6 वर्षे झाली आज, मी
नोकरी करत आहे,
माझ्या प्रेमाशिवाय मी
एकाकी जीवन जगात आहे!८!

काल आठवण आली म्हणून
तिच्या घरी रिंग केली,
तिच्या आईकडून मला
वेगळीच बातमी कळली!९!

मी जायच्या दुसरया
दिवशीच ती आजारी पडली,
अन माझ्या विरहाच्या
तीव्र दुखानेच देवाघरी गेली!१०!

तिचे अव्यक्त शब्द कळलेच नाही
तिच्या मनातील भाव ओळखलेच नाही
तिच्या डोळ्यातील प्रेम जाणलेच नाही
म्हणून, मला प्रेम कधी जमलेच नाही!११!
मला प्रेम कधी जमलेच नाही.......!!!

का अजूनही तू हवीशी वाटतेस


का अजूनही तू हवीशी वाटतेस
" एवढं " सारं झाल्या नंतरही .....

तुझे हात पहिले की ,
कधीकाळी झालेल्या स्पर्शांची आठवण होते
तुझ्या अशा कितीतरी गोष्टींशी निगडीत
अगणित गोष्ट आतःवत राहतात

तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण
शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचा तो राग
आणि मग पुढे,मी लपवलेले
सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू
अन हसऱ्या खळीमागाची कडवट दुःख ....

वाटायचं की तुझेही डोळे भरून आले असतील
कदाचित तुही गुडघ्यांत मान खाली घालून
रात्रभर बसली असशील
झोपेची वाट बघत,
मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील..तुही. ..कदाचित....

कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला
माझ्यापासून ...माझ्या स्वभावापासून ....

आता बरेच महिने लोटले
आता बऱ्यापैकी पुसलं गेलय दुःख
शेवटी काळ हे जालीम औषध असतं
" असल्या " जखमांवर ...
किंवा नसेलही कदाचित .....

का अजूनही तू हवीशी वाटतेस
" एवढं " सारं झाल्या नंतरही .....

पाणी-पुरी..
एक कटोरी हातात घेऊन..
त्यात एक गच्च भरलेली पाणी-पुरी
ती उचलून तोंडात भरायची
तिचं ते गटकन फुटुन तोंडभर पसरणं
मग सगळीकडुन येणारा पूर आणि धूर
कधी तोंडातून.. कधी नाकातून
कानशीलाजवलून वहाणारा ओघळ घामाचा
लागलेला तो ठसका जीवघेणा..
आणि त्यानंतर रेंगाळलेली ती चव.. हवी हवीशी.!!
.
.
आयुष्यही असच काहीसं..
रोज त्याला हातात घेऊन उभं रहायचं
नव्याने भरलेली पाणी-पुरी खायची..
उसळणा-या लाटात मग डुंबायचं की बुडायचं..
ते ज्याचं त्यानेच ठरवायचं
लागतो कधी जीवघेणा ठसकासुद्धा
आणि त्यानंतर जगावसं वाटणारा दिवस नवा नवासा..!!
.
.
पण .. फक्त..

तू दोन शब्द माझे


तू दोन शब्द माझे
आता तरी ऐक्शिल का?
आणि विसरून सार काही..
तोडून बंधन सारी..
माज्या प्रेमात पुन्हा
तू विरघळषील का?
.
.
तू परत येशील का?

तुझाच आहे मी अजूनही,
असेन फक्त तुझाच नेहमी.
तुही होतीस मझीच फक्त..
पुन्हा माझीच होशील का?
.
.
तू परत येशील का?

आणि तू आलिस अचानक..
सोबत घेऊन सुख सारी..
ओठांवर तीच गोडी,
स्पर्श तोच चंदेरी..
अशा माझया एखाद्या स्वप्नात तरी..
येऊन कवितेतली माझी अप्सरा,
तू होशील का?
.
.
तू परत येशील का?

मन माझ म्हणत,करू मी काय करू...
प्रेम केलेल तुझयावर,
अस कस विसरून जाउ..
तुझे डोळे मात्र माझयाकडे
अनोळखी नजरेने पाहत असतात..
क्षणोक्षणि मला दुखात जाळत असतात..

असच जेवा जाळतील प्रेत माझ..
लपून का होईना..
तू दोन अश्रू तरी गाळशील का?
राणी मला शेवटचा निरोप देण्यासाठी तरी,
तू परत येशील का?
.
.
तू परत येशील का?

कधी त्या जागेवर


कधी त्या जागेवर संध्याकाळी
ती बिलगून अशीच बसायची
मावळतीला तोच सूर्य
अन मनात ती हुरहूर अशीच असायची
.
.
.
हातात हात असायचा तिचा
समोर असायचे निळ आकाश
मनात उद्याची स्वप्न अनेक
दोघे बसायचो रंगवत खास

श्वासात श्वास अडकायचा कधी
चढत जायची धुंदी अनाम
बरसायच्या कितीतरी प्रेम धारा
व्हायचो जरी किती बदनाम

सात जन्म साथ द्यायची
वचन द्यायचो रोज कितीतरी
हे रेशीम बंध नाजूक
गुंफित जायचो रोज कितीतरी

रात्र व्हायची अन विरह सलायचा
समोरचा काळोख उगीच मनात दाटायचा
काय व्हायचे नक्की ठाऊक नाही
काहीतरी सुटतंय नेहमी भास व्हायचा
.
.
.
आज ही मी त्याच जागेवर
तीही बिलगून तशीच बसलेली
मावळतीला जणू सूर्य असा मी
अन तिने मात्र ... जागा बदललेली

Monday, May 17, 2010

अदृश्य वात्सल्य बापाचे..!!



जयाचे बोट धरून पाहिले पावूल टाकतो , त्यालाच आपण विसरतो.,
आणि लेकराला चालताना पहाणारया आईचेच कौतुक करत बसतो.,
आपल्या जन्माच्या यातना आई सहन करत असते.,
तर बापाची चप्पल मंदिर शोधण्यात झिझात असते.,
एक वेळचे जेवण न घेताच बाप झाल्याचे पेढे वाटतो.,
केवळ पुरुष असला म्हणून आपले अनंदाश्रु गळयातच गिळतो..!!

रक्ताचे पाणी करून लेकराला शालेत घालतो.,
नरकीय परिसस्थितही बाळहट पुरवितो.,
मुलीच्या लग्नापाई नुसत्या भजी पाहून परततो.,
दुरदैव कोणाला शिवू नये म्हणून पावसातच रडतो.,
चुकलोच कधी तर मर-मर मारतो.,
तोच हात रात्रि जेवताना मात्र थर-थर कापतो..!!

सणाला आईला जुनाच शर्ट धुवायला सांगतो.,
नवपना अणन्यासाठी गुपचुप रात्रीच इस्त्री करतो.,
पोराना मात्र कोराच ड्रेस आणतो.,
पर अजारी पडले तर आई काळजीपाई रात्रभर जागते.,
तर बापाला ओवर-टेमला रात्र कमी पड़ते.,
पोर आपल्या पायांवर उभा झाल्यावर मात्र माय-बापाला विसरतो.,
चार दिवसांच्या बायकोच्या पदरात पसरतो.,
आपल्या एशो-आरामत जलम-दात्यालाच विसरतो..!!

ठेच लागल्यावर मात्र तो " आई ग..! " केल्यावाचुन राहणार नाही.,
समोरूनाच साप गेला तर " बाप रे..! " म्हणल्यावाचून राहणार नाही.,
घेतले हजारो जलम जरी ,उपकर या दैवतांचे फेड़ता येणार नाही.,
उद्या आपणही माय-बाप होणार हे विसरून चालणार नाही.,
पाठवलेच वृधाश्रमात नाराधमाने तरी यांची ममता संपणार नाही.,
आपल्या जन्मदात्याचे हल करनारयाला
नरकातसुधा जागा मिळणार नाही.,
नरकातसुधा जागा मिळणार नाही..!!

तिची आठवण ...



सारखी सारखी तिची
एवढी आठवण का येते....?
सतत मनाला क्षणाक्षणाला
का छळत असते....?

रोजच आम्ही भेटत असतो
रोजच आम्ही बोलत असतो...
तरी सुद्धा तिला भेटायला
ओढा माझा हरपल असतो....

तासनतास आम्ही मनमोकळ बोलत असतो
एकमेकांचे सुख दुखः वाटून घेत असतो

एकदा ती सहजच म्हणाली......
मला विसरतोस म्हणूनच तुला आठवण येते.....
त्यावेळेस मी निरुत्तर होतो.....
पण.......

आठवण म्हणजे काय.....?
तिने जाण्याचा विषय काढताच माझ मन अधीर होत
नजरेआड होण्याअगोदर तिला पुनः एकदा भेटू वाटत......
अस का होत नेहमी कि......
नेमक जाण्याच्या अगोदर तिच्या बरोबर भरपूर बोलायचं असत......
बरच काही सांगायचं असत.....

मलाच नाही सांगता येणार काय होतंय ते .....
पण एवढ मात्र खर कि
तिची आठवण मला क्षणाक्षणाला येत असते
सतत मनाला छळत असते.....

चार दिवस प्रेमात..



तिच्या एका होकाराने
पूर्ण जीवन बदलून टाकले
चारच दिवस का होईना
मला तिचे प्रेम मिळाले..
-
सर्वात आनंदाचे क्षण
देऊन गेली ती मला
कळालेच नाही कधी
ती सोडून जात होती मला..
-
मी निस्वार्थी प्रेम केले होते
तिचे सुद्धा खरे असावे
मग असे का घडावे
आनंदाच्या क्षणी दुःख यावे..
-
सर्व तिच्या मनाचे खेळ
माझ्या हाती काहीच नव्हते
तिने खेळलेल्या खेळातील
मी एक साधा प्यादा होतो..
-
तिने सुरु केलेला खेळ
आज तिनेच संपवलाय
मला जिंकणे कठीण नव्हते
पण मी तिच्यासाठी हरलोय..

बायको......




ही जराशी गोंधलेली असते
थोडीशी बेफिकीर ही भासते
मला कधी उशीर झालाय्वर
हिच्या मनाची उलघाल होत असते

मी कितीही नाही म्हणलो तरी
चहात कमी साखर असते
दुपारच्या डब्यात मात्र नक्की
एक पोळी जास्त असते

सकाळी सालस असणारी ही
रात्री तेवडीच खट्याळ असते
दुसरया दिवशी आरशात पाहून
एकटीच गालातल्या गालात हस्ते

हीला काही अवडल तर
लेबल भागून मुरड घालते
माझ्या साठी नेहमी काही ना काही
घ्याचा हट्ट करत असते

माझा पगार किती तोकडा
आहेय हीला जास्त माहित
म्हणून महिना अखेरच्या शर्यतीत
ही नेहमी पहिली असते

तरीच कितीही कोणी भाळल
तरी बायको ही बायकोच असते
बायको ही बायकोच असते

काय असत प्रेमात .....?


काय असत प्रेमात .....? कसली असती हुरहूर...?
कशी असती काळजातली धडधड....? काय मज्जा असते चोरून चोरून भेटण्यात...?
कस वाटत तेच तेच फोनवर तासनतास बोलायला....? काहीच माहिती नव्हत.....

चला एकदा '' TRY '' घ्यावा म्हणून प्रेमात पडायचं ठरवलं....
खोट - खोटच पण तरीही त्यात शिरायचं ठरवलं....मित्रांना फुगवून सांगायचं.....
माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....
आणि एकदाचा तिच्या प्रेमात पडलो.....तिला याची काहीच कल्पना नव्हती...!

आणि मी तसाच विचार करायला लागलो......
हुरहूर.......धडधड.....जे काय असत ते सगळ मिळाल.....!!
मित्रांना फुगवून सांगितलं .....माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....

पण...अचानक दोन - चार दिवस ती मला भेटलीच नाही....
आणि मग माझी मनात कालवाकालव व्हायला सुरु झाली ..
अरे.. हे सगळ खोट -खोट होत मग अस का होतंय.....

मी खोट - खोट म्हणता म्हणता .....
खरच प्रेमात पडलो....अगदी मनापासून ......!!

घरामध्ये बसू वाटत नव्हत......
ऑफिस मध्ये काम करू वाटत नव्हत.....
सतत तिचाच विचार.....
प्रत्येक ठिकाणी तिचाच चेहरा दिसायचा....!

एकट एकट राहू लागलो.....शांत शांत ....गुमसुम राहू लागलो .....
'' दोस्तो कि दोस्ती,यारो कि यारी कम लगने लगी ''हे सुद्धा खर झाल...!!

तिला तर काहीच सांगितलं नव्हत....इकडे माझ्याच मनाचा गोंधळ चालला होता.....
तिला सांगाव म्हणून मी एका संधीची वाट पाहू लागलो......आणि एक दिवशी तिच स्वतःहून माझ्याकडे आली...!

अरे वा......! मी संधीला शोधण्यापेक्षा संधीच माझ्याकडे आली होती...!!
मी जाम खुश झालो......ती आलीच.....पण.....येताना ती तिच्या '' प्रेमाला '' घेवून आली....
खास माझ्या भेटीसाठी......

जखमेवर मीठ चोळतात तसच काहीतरी माझ झाल.....
पण तिला तरी काय दोष देणार..... तिला तरी हे काहीच माहिती नव्हत....
आणि आमच्या प्रेमाची कळी खुलण्याआधीच सुकून गेली....आणि अस म्हणतात कि ......
'' जब दिल तुटता हैं तो उसकी आवाज नही आती....''मी तो आवाज ऐकला......अगदी खरा खरा.........