Tuesday, December 9, 2008

अकरावा अवतार.......

सोड बासरी शस्त्र घेऊनी
परशूराम हो श्रीक्रुष्णा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा


शंख फुंकलास धावून आलो
विश्वरूपाने पावन झालो
अकरावा अवतार घे आता...
शक्तियुक्ती संमिश्र गुणा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा


दूर्योधन, जयद्रथ इथलेच सारे...
अत्याचारी वादळवारे
अन्यायाचा तम उजळाया
का..विकत घ्यावे रविकिरणा ?
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा


हिरवा, भगवा परका नाही
व्रण आत्म्यावर नवखा नाही
अर्जुन होऊन लढलो केवळ
एवढाच ना आमचा गुन्हा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा


भले रुक्मिणी होईल विधवा,
विजय कदाचित मिळेल कौरवा...
तरिही तूच ये चक्र घेऊनी...
नको होऊ सारथी पुन्हा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा


साधू होऊन रहाणे नाही
रक्त सिंधूला वाहाणे नाही
शौर्याचा अन् क्रौर्याचाही
आठवूया इतिहास जूना
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
सोड बासरी शस्त्र घेऊनी
परशूराम हो श्रीक्रुष्णा

एक कळ..


किती दिवसांचा अबोला मला भोवुन गेला

वरून शांतता तरी पेल्यांतलं वादळ देवुन गेला
नांत नसल तरि बंधन आहे
मैत्रिच, आवरण पांघरलेल

काही क्षणांच्या सहवासाने नुकतच बहरु लागलेल

वाटल होत वसंताच आगमन

होवु घातलय...

पण.... शिशीराची पानगळ झाली

अजाणतेपणी ह्रुदयाला भेदुन

एक कळ गेली..

Monday, May 5, 2008


'लव' की प्रेम?'

लव' शब्दच कीती पोकळ,

'प्रेम' शब्दातच कीती बळ.

'लव' एक बेछुट अंधानुकरण,

'प्रेम' एक अतुट बंधन.

'लव' मनांची फ़सवणुक,

'प्रेम' मनांची जपणूक.

'लव' कोमेजलेला गंध,

'प्रेम' दर्वळलेला सुगंध.

'लव' नसमजून बोलणं,

'प्रेम' नबोलून समजणं.

'लव' मेसेज सरकवणं,

'प्रेम' मेसेज बनणं.

'लव' आंधळ करतं,

'प्रेम' बघायला शिकवतं.

म्हणूनच,'प्रेम' नसलं तर काहीच नसतं,

'प्रेम' असलं तर सारकाही असतं,

'प्रेम' असलं तर जग असतं.

तेंव्हा बघा तुम्हाला काय दिसतंय?

'लव' की 'प्रेम'!

प्रेमात आणि मैत्रीत


प्रेमात आणि मैत्रीत झोकुन देणे, विश्वास टाकणे धोका पत्करणे हे फ़ार गरजेचे असते ......

प्रेम म्हणजे भावनांपुढे विचारांनी हार स्विकारलेली

प्रेम म्हणजे मनापुढे मेंदूने शरणागती पत्करलेली.......

प्रेमात हवी फक्त एक नजरभेट ,स्वप्नांचे झोके झुलण्यासाठी..

अवचित हलकेच स्मित हास्य अक्षतांचं चांदणं झेलण्यासाठी.....

एवढ सगळ घडत असत .....म्हणुन....

प्रेम करण सोडायच नसत...........

मर्यादेत राहुन आपण वागायच असत......

समाजाच भान ठेऊन जगायच असत.........

आणि हे सगळ लक्शात ठेऊनच .........

आपल्या माणसान्वर प्रेम करायच असत.......

जे झाल ते गेल......ते प्रेम नसेलच मुळीहे लक्शात घ्यायच असत........

प्रेम करणारया माणसालाफ़ुलान्प्रमाणे जपायच असत..........

Sunday, May 4, 2008

कवीता असते.........


कवीता असते डोळ्यात लपलेल्या अश्रूंसारखी

कवीता असते फुला त लपलेल्या सुगधासारखी

कवीता असते वातावरणात पडलेल्या दवासारखी

कवीता असते हृदयात धड धड नार्‍या ठोक्यांसारखी

कवीता असते शब्दात दडलेल्या स्वरांसारखी

कवीता असते ओठ वर य नार्‍या आशीर्वाद सारखी

कवीता असते पाठीवर पडलेल्या थापेसारखी

कवीता असते मधात विरघळलेल्या गोडीसारखी

कवीता असते बागेत उमललेल्या काळीसारखी

कवीता असते आकाश्यात उधळलेल्या इंद्रधनुष्या सारखी

कवीता असते स्वाचन्दपणे बागडनार्‍या पाखरा सारखी

कवीता असते मातीच्या मंद गंधासारखी

कवीता असते घाव भरणार्‍या मलमासारखी

कवीता असते दुसर्‍यांसाठी जळणर्‍या पणतीसारखी

कवीता असते दुखात खंबीर सात देणार्‍या मित्रासरखी

अशी गोड तू......


फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू

निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता,

सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू

ढगांनी झुलावे हळूवार आता तुझ्या अंगणी,

नभाने तुला पाहताना झुकावे अशी गोड तू

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,

दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

दिल्या या मनाला सुगंधी सखे तू

यातना,व्यथेने पुन्हा वेदनेला भुलावे अशी गोड तू

फुलांच्या बागेत आज काटा बोलला,नेहमीच्या भाषेत मी त्याला हाकलला,आज एक फुल नाही मिळाले वाट्याला,मग म्हंटले आता विचारुच या काट्यालातो मलुल होता पण तरीही सांगु लागला,"मित्रा, मी रक्षक होतो त्या फुलासाठी,पण आज डोळ्यासमोर हारलो रे!"मी म्हंटले, "नवीन काय रे यामध्ये??रोज तर सगळेच असेच फुल खुडतात"..तो म्हणाला, "अरे त्या त्या फुलात,माझा जीव गुंतलाय ना!"मी म्हंटले, "अरे वेड्या हा तर निव्वळ मुर्खपणा!!"तो भडकला अन म्हणाला,"अरे आईबापही रक्षक असतात ना,त्यांना ही तर काटाच ठरवितात ना कधीतरी!!मग त्यांनी त्यांनी आपल्या फुलास जीव नाही का लावायचा??ते जाउदे असं बघ,तुही तर असशील ना कुणासाठी 'काटा',(कारण तुही रक्षक आहेस कुणाचा!!)कोणीतरी तुझ्यासाठी ही असेल 'काटा'(तुलाही कोणीतरी हवे आहेच ना!!)तुही 'फुल' असशील ना कुणासाठी,(तुझ्यावर जीव लावणारे आठव!!)कोणीतरी 'फुल' असेल ना तुझ्यासाठी,(तुझा जीव कुणासाठी तरी तुटतो ना!!)आणि हो,कधीतरी एक 'काटा' दुसर्‍या 'काट्याला'भारी पडतोच रे!!"एवढं ऐकुन जड पावलाने बागेतुनबाहेर पडत होतो अन तेवढ्यात पायात एक काटा रुतला...

पाचोळा समजून चरोळ्याना माझ्या तुडवू नका,कृपा करून माझ्या शब्दाची खिल्ली मात्र उडवू नका.राग येत नाही, पण वाईट वाटतं इतकंच...माझं किवा तुमचं कोणाचं तरी... नशीब मात्र फुटकंच !खरं तर हा ज्याच्या त्याच्या पहाण्याचा दृष्टीकोन आहे,तसंही जगात सर्वसुखी असा कोण आहे ?म्हणून काही लिहू नये... असंही वाटू लागतं,त्याक्षणी दुसरं मन माझं ... जाब माझ्याकडे मागतं !मन म्हणतं.......................उधळ रंग कल्पनाचे, खुलुदे काव्याची कळी,शब्दान्धान्च्या काव्याला.... नको पडूस असा रे बळी.स्वयंप्रकाशी तारयाचा, अरे ज्याना त्रास होतो..काजव्यात वा दिव्यात ज्याना सुर्याचा भास होतोअशा शुल्लक उल्लुकाना, काय कळावा राजहंस ?मोरपंखी स्पर्श देखील... ज्याच्यासाठी सर्पदंश !म्हणूनंच.....माझ्या आनंदासाठी मी काही काव्य करत जातो,स्वर्गसुखाच्या अपेक्षेने खरं तर मी मरत जातो...मेल्यानंतरच स्वर्ग पहाण्यात आहे खरी मजा...काय फायदा आहे, होण्यात भातुकलीतला राजा ?शब्दाना धार असते, तरीही.....जिभ कापली जात नाहीम्हणून कहिही लिहावं, अशी आपली 'जात' नाही.

अव्यक्त प्रेमाची कधीच वाटली नाही खंत

बाळगला संयम योग्यासारखा नव्हतो जरी संत

आनंद होकाराचा दुःख नकाराचं अनुभवु शकलो नाही

धैर्य नव्हतं म्हणा हवं तर पण मी चुकलो नाही

ठरवू पाहात होतो मीच माझं प्रारब्ध

झालो तिच्यावर लुब्ध पण होतो निःशब्द

मागुन तिच्या मी उगीच भटकलो नाही

धैर्य नव्हतं म्हणा हवं तर पण मी चुकलो नाही

मी होते तिथेच आहे.........


मी होते तिथेच आहे बाकि सारे बदलले

ह्रुदयातल्या स्पन्दनाचे वादळ आता शमले

मी होते तिथेच आहे काळ मात्र बदलला

सरत्या सरितला गारवा मात्र उरला

मी इथेच आहे पन तु मात्र नाहिस

मझ्या मनाला तुझिच तरि साथ आहे

दूर जरी मी तुझ्यापासुन इथे

तुझाच मझ्या हाति हात आहे

मैलांचे अंतर आपल्यात आहे

तरि मने मात्र जोडलेलि

माझ्या एकाकि जीवनाने

आठवनीची चादर ओढलेलि

खरच आठवनित तुझ्या जेव्हा पापणीची पणती विझते

तुझ्या चाहुलिने संध्या रात्र रात्र जळतेपण हे मझे मलाच कळते




चार पावलं आपणसोबत चालत जाऊ


तुझे आणि माझे सूरकुठवर जुळतात पाहु...


अर्थात जमत असेल तर चलमी


आग्रह करणार नाहीआज तरी, "तुला यावच लागेल,


असा हट्ट ही धरणार नाहीपण मनातल्या मनात कुढण्यापेक्षाव्यक्त


करणं बरं असतंकारण इथून तिथून ऐकलेलंसारंच


काही खरं नसतंकुणी कुणाला का आवडावंहे सांगता


येत नाहीचार चौघांना विचारून कुणीहृदय देत नाहीतसंच


काहीसं माझं झालंत्याच धुंदीत propose केलंजवळ अशी


कधी नव्हतीसंचpropose ने आणखीच दूर नेलंजे झालं ते वाईट


झालंपण झालं ते बरंच झालंखरं सांगणं गुन्हा असतोएव्हढं मात्र


लक्षात आलंजाऊ दे,झालं गेलं विसरून जामागे न वळता


चालत राहामला विसर असं मी म्हणणार नाहीपण


तू तो प्रयत्न करून पाहा...थांब...इथून पुढं मला एकट्यालाच जायचंयपण


धन्यवाद; तू इथवर आलीस...सारं आयुष्य नसलीस तरीचार पावलं माझी झालीस....

Saturday, March 15, 2008

एक थेंब ....


एक थेंब .... पानावर सजलेला.. हिरवाईच्या रंगात हिरवळलेला..
एक थेंब .. अमृतवेलावर लटकलेला, धरती चुंबनाच्या प्रतिक्षेत तहानलेला..
एक थेंब .. कमळाच्या देठावर अधारलेला, ओघलण्यासाठी मग लय कशाला हवीये त्याला..
एक थेंब ... तळ्यातल्या थेंबाबरोबर मिसळलेला, आपणच तळे झालो या आंनदाने भारावलेला..
एक थेंब .. वार्‍यात उंच झेपावलेला, गारव्याच्या शहारा मग त्याने सर्वत्र पांघरलेला..
एक थेंब ... थेंबाथेंबातुन बरसलेला, शिस्तिच्या आहारी मग सरींच्या मर्यादेत सांडलेला..
एक थेंब ... परिश्रमाच्या घामातला, जिंकण्याची उमेद बाळगलेला..
एक थेंब... कळीच्या गाभार्‍यातला, समांगाने फुलात उमलवून गेला..
एक थेंब.. ओठांच्या पाकळीतला, गुलाबी नाजूक ओठांशी संवादलेला...
अन एक थेंब अखेर...

आठवणीच्या स्पंदनातला, ओल्या पापण्या अन ओल्या कडातून मना ओलावलेला..

Sunday, March 2, 2008

♪ मराठी ♪


उगवणारी प्रत्येक सकाळ नवी पालवी फ़ुलवते

मात्र मावळती संध्याकाळ रीतेपणाची चाहुल देते

आयुष्यातील घटनांचा संदर्भ लावताना

अश्रुच टीपायला लागतात त्यातून सावरताना

ठरवीलेले मनसूबे पुर्ण होतातच असे नाही


तरी ते ठरवीण्याची आपली खोड जात नाही


आपल्या जवळ जे नाही त्याचीच मानवी मनाला ओढ असते

सर्वच मनं सारखी घडत नसतात

म्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते


माज़े काहि चुकत् नव्हते तिचे वागने वावगे नव्हते,

ऐक् मात्र खर् कि बरोबर् कहिच् येत् नव्हते!


तस् पाहिल् तर् निर्जीव् हवा

आलि अन् गेली, पन् जो पर्यन्त् आत् होती

शरीरात् जीवन् फ़ुलवून् गेली!


सगळ्या गोष्टी कशा भराभर घडत गेल्या

मी प्रेमात पडलोय म्हणेपर्यंत

एकाकी कातरवेळा उठवायला आल्या


उगवणारी प्रत्येक सकाळ नवी पालवी फ़ुलवते

मात्र मावळती संध्याकाळ रीतेपणाची चाहुल देते


आज उणे आले आयुष्यात तर

उद्या अधिकही येतील, नेहमीच चुकणारी गणितं

पैकीच्या पैकी मिळवून जातिल!!!


उधाणलेला सागर वादळी वारा,

बुडणारी नाव आणि शांत किनारा!!!

♪ मराठी♪


तुझ्याविना माझी सगळी वस्तीच बकाळ झाली,

विचार करता करता न कळत सकाळ झाली..


जीवन आणी जीणे यातलेआता कळाले अंतर...

काही तु येण्यापूर्वी....काही तु गेल्या नंतर...!!!


तुझ्या घरावरून जातानाहल्ली तिकडे नजर वळत नाही...

मनाचे ठीक आहे गपण आसवांना काहीच कळत नाही.........


तुझा विचार करणं आता नकोसं वाटतं

अस म्हणून मन माझं मलाच फ़सवतं


कधी कधी मला वाटतंमी अजरामर असेन

झाली जर का जगबुडी तर तुमची वाट बघत बसेन


मला माहित नसलेलं दुःख माझ्या मनात साठून आहे

बरेचदा मी विचार करतो नक्की याचा ओघ कुठुन आहे


आनंदाचे क्शण लवकर संपतात आठवणी बनून मनात साठतात

हे दिवसही असेच संपतील आठवणी होउन पुन्हा बोचतील...

दीप मझ्या आठवणींचा जाशील तिथे सांभाळ

कोण जाणे आयुष्याची केव्हा होइल संध्याकाळ...


सुवर्णाच्या पावलांनी लक्ष्मी म्हणून नव्या घरात शिरायच

हातावरच्या पुसट होणार्‍या रंगासवे माहेराला विसरायचं....

Thursday, February 28, 2008

अक्षतांचं चांदणं ....


चांदणं चांदणंच असतं। त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही.

डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही। म्हणुनच गोंगाट नाही।

ते नम्र असतं। उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही.

ते जितकं प्रखर, तितकं सौम्य।

चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का?

अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार

फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!

.......(अक्षतांचं चांदणं ....अरविंद)

Wednesday, February 20, 2008

भावना...........


शब्दाचं बोट धरून भावना कागदावर अलगद उतरली,

मनातल्या चिमुकल्या बीजातून कवितेची वेल बहरली!

कवितेच्या वेलीला कवितांच्याच कळ्या आल्या,

भावनांच्या रेशीमगाठी अजून-अजून मोकळ्या झाल्या!

एके दिवशी कळ्यांतून मोहक फुलं उमलली,

मनातली अनेक कोडी कवितांनीच उकलली!

कवितेची बकुळफुलं कोमेजूनही फुललेली,

नकळतच दिसली मनाची बंद दारं खुललेली

ज्या ज्या वयात जे जे करायचं


ज्या ज्या वयात जे जे करायचं त्या त्या वयात ते ते करायचं!

लहानपणी फुलपाखरांच्या मागे धावायचं

तरुण वयात 'पाखरां'च्या मागे धावायचं

प्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं

म्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...

ज्या ज्या वयात जे जे करायाचं
त्या त्या वयात ते ते करायचं!

लहानपणी ऊन वारा पावसामधे मनमुराद बागडायचं

तरुणपणी प्रत्येक श्वासात मोगरा घेऊन जगायचं

प्रौढ वयात आपल्या भोवती नंदनवन फुलवायचं

म्हातारपणी त्याच बागेत निवृत्त मनानं रमायचं

ज्या ज्या वयात जे जे करायचं

त्या त्या वयात ते ते करायचं!

लहानपणी खेळातलं भांडण जिथल्या तिथे मिटवायचं

तरुणपणी मोर्चे न्यायचे, आंदोलनसुध्दा करायचं

प्रौढ झाल्यावर आपल्या तक्रारींची मुळं शोधत रहायचं

उतारवयात साऱ्या मुळांना गीतेत बुडवून टाकायचं

ज्या ज्या वयात जे जे करायचं

त्या त्या वयात ते ते करायचं! तरीही काही गोष्टी प्रत्येक वयात जमायला हव्यात

पहिल्या पावसाच्या पहिल्या धारा अंगावरती झेलायला हव्यात!

वाऱ्यासोबत पिसासारखं हलकं होता यायला हवं

गडगडणाऱ्या मेघासारखं बोलकं होता यायला हवं

अंधाराच्या गर्भामधे ज्योत ठेवता यायला हवी

एकटं खूप वाटतं तेंव्हा गाणी म्हणता यायला हवी!

कुठल्याही वयात आपला आनंद आपणच शोधत रहायचं...

तरीही...ज्या ज्या वयात जे जे करायचं

त्या त्या वयात ते ते करायचं!

आईलाही....


(आई तुझ मन, तुझ्या आशा,तुझं महात्म्य समजुन घेन्यासाठी आम्हि खरच लहान आहोत.)

आईलाही 'मन' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही

तिचं सूध्धा 'स्वप्न' असतं,अम्हाला ते कळालंच नाही

'आई' राबते दिन्-रात्र, आम्हाला घडवण्यासाठी

आम्ही असतो विचार मग्न, आमुच्याच स्वार्थासाठी

आईच 'श्रेष्ठ गुरु' असते, अम्हाला कधी समजलंच नाही

तीच आमुचा आधार असते, अम्हाला ते कळालंच नाही

'आई' झोपते उपाशी पोटी, आमचं पोट भरण्यासाठी

आम्ही सदा पैशे उडवतो, अमुच्याच हवसेपोटी

आईच्या सूध्धा 'आवडी' असतातं, अम्हाला कधी समजलंच नाही

तिलां सूध्धां 'हसायचं' असतं, अम्हाला ते कळालंच नाही

'आई' नेसते फाटकं लुगडं, आम्हाला सजवन्यासाठी

आम्ही सदा रागावतो तिच्यावर,आमुच्याच चूकीसाठी

आईलाही 'जगायंचं' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही

तीच खर 'धन' असतं,अम्हाला ते कळालंच नाही.

आईलाही मन असतं, अम्हाला कधी समजलंच नाही

तिचं सूध्धा स्वप्न असतं,अम्हाला ते कळालंच नाही

वडील घरचे अस्तित्व असतात..............


आई घरचे मांगल्य असते तर वडील घरचे अस्तित्व असतात पण घराच्या या अस्तित्वाला खरच आम्ही कधी समजून घेतले आहे का? वाडिलाना महत्व असुनाही त्यांच्या विषयी जास्त लिहिले जात नाही, बोलले जात नाही, कोताही व्याख्याता आईविषयी बोलत राहतो. संत महत्म्यांनी आईचे महत्व अधिल सांगितले आहे. देवदेविकानी आइचेच गोडवे गायले आहेत. लेखाकानी कविनी आईचे तोंडभरून कौतुक केले आहे. चांगल्या गोष्टिना आईची उपमा दिली जाते पण वडिलनविषयी कुठेच फारस बोलले जात नाही. कही लोकनी बाप रेखाताला पण तोही तपत व्यसनी, मर्जोड़ करनाराच, समजत एक दोन टक्के असे बाप असतील पण चांगल्या वडिलनबद्दल काय?आईंकडे अश्रुंचे पात असतात पण वडिलांनकड़े सयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वाडीलानाच करावे लगते आणि राडन्यापेक्षा संत्वन करनारयावर जास्त तान पडतो कारन ज्योतिपेक्षा समयीच जास्त तपते ना? रोजच्या जेवानाची सोय करणारी आई आमच्या लक्षात रहते पण आयुष्याच्या शिदोरिची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई मोकलेपनाने रडू शकते, पण रात्रि उषित तोंद खुपसून मुस्मुसतातात ते वडील असतात. आई रड्ते, वाडिलाना राड़ता ही येत नही, स्वताचे वडील वराले तरी राड़ता येत नाही, कारन तय्ना छोट्या भावंडाना जपयाचे असते. आई गेली तरीही राड़ता येत नही कारन बहिनिला आधार व्हयाच असत. पत्नी अर्ध्यावर साथ सोडून गेली तरी पोरंसाठी आधार बनवा लागतो.जिजाबाई नि शिवाजी घदवाला अस आवश्यक म्ह्नव पण त्याच वेळी शाहाजी राजाची ओधातान सुधा ध्यान्यत घ्यावी. देवकीच, यशोधाच कौतुक अवश्य करव पण पोरातुं पोराला डोक्यावर घेउन जाणारा वासुदेव सुधा लक्षात ठेवावा. राम हा कौसलेचा पुत्र आवश्य असल पण पुत्र वियोगाने तड्फ़ड्न मरण पावला तो पिता दशरथ होता.

वाडीलाच्या टाचा जिजलेल्या चापलाकडे पाहिले की त्यांचे प्रेम कलाते. त्यांचे फांटके बनियान बघितले की कलते "अम्ह्च्या नशिबची भोके त्यांच्या बनियानला पडलित". त्यांचा दाढ़ी वाधलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊँन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पाँन्टच वापरातिल. मुलगा सलून मधे २०-२५ रुपये खर्च करतो. मुलगी पार्लर मधे खर्च करते पण घरातला दधिचा सबन संपला म्हनून आंघोलिच्या सबनाने करतात. अनेकदा ते नुसत पानी लाऊंन दाढ़ी करतात. वडील आजारी पडले तरी डॉक्टर कड़े जाट नाहीत, ते आजराला घाबरत नाहीत पण डॉक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याना भिती वाटते. कारन पोरिचा लग्न, पोराचे शिक्षण बाकी असते, घरात उत्पन्नाचे दूसरे साधन नसते, एपत नसते तरीही मुलाला मेडिकल ला एन्जिनिअरिंग ला प्रवेश मिलों दिला जातो. ओधातान करून मुलाला डर महिन्याला पैसे पठावाले जातात, पण सर्वच नसली तरीही कही मुले अशी असतात की जे पैसे आले की मित्रना पार्ट्या देतात आणि ज्या वडिलांनी पैसे पठावाले त्यांची टिंगल करतात. एकमेकांच्या बापच्या नावाने एकमेकाना हाका मारतात.आई घरचे मांगल्य असते तर वडील घरचे अस्तित्व असतात. ज्या घरत वडील आहेत त्या घराकडे वाइट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण त्या घरचा कर्ता जिवंत असतो. कोणत्याही परिक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण टी जवळ घेते, कवताळते, कौतुक करते, पण गापचुप जाउन पेढयांचा पुढा घेउन येणारा बाप कोणाच्या लक्षात रहत नाही. चटका लागला, ठेच लागली की "आई ग" हा शब्द बाहेर पडतो पण रास्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येउन ब्रेक लागतो तेव्हा "बापरे" हाच शब्द बाहेर पडतो. छोट्या संकतकाली आई चलते पण मोथिमोठी वादल पेल्ताना बापच आठवतो. काय पटते न????

कोणत्याही मंगल प्रसंगी सर्वजन जातात पण मयाताच्या प्रसंगी बापाला जावे लगते. कोताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी सारखा जात नसतो पण गरीब लेकिच्या घरी तिच्या कालजी पोटी सारखा फेरया मारेल. मुलाच्या नोकरीसाठी लाचार होनारा बाप, मुलीच्या लग्नासठी उम्बरठे जिज्वानारा बाप, घरच्यासाठि स्वताच्या व्यथा दड़्पनारा बाप..........खरच किती ग्रेट असतात न????वडिलांचे महत्वा कोणाला कळत? लहनपनिच वडील गेल्यावर अनेक जबाबदाराया खुप लवकर पेलाव्य लागतात, एकेका वस्तुसाठी तरसवे लागते त्याना. वाडिलाना खरया अर्थाने समजून घेते ती मुलगी. सासरी गेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापशी फोनवर बोलताना बदलेला आवाज एक श्क्नात्त कलतो., ती अनेक प्रश्न विचरते. कोनतिही मुलगी स्वताच्या इचछा बाजूला ठेउन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढ़ते. मुलगी बापाला जानते, जपते..... इतारांची श्रद्धा, असाच आपल्याला जानावा हीच प्रतेक बापाची किमान अपेक्षा असते.

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं............


वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं,

म्हणाली चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो

चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?

टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला

नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला

आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण

दुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण

मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं

विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं

एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?

Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?

शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी

प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी

लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली

हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली

प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते

कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,

ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते.

दूरावा म्हणजे प्रेम...


दूरावा म्हणजे प्रेम...

अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...

दूराव्यात असते आठवण...

अन, ऒलाव्यात असते ती साठवण...

दूराव्यात अनेक भास असतात...

अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..

दूरावा असह्य असतॊ...

ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...

दूराव्यातही असावा ऒलावा...

पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा...

दूराव्यात प्रेमाचं घर असतं,अन,

ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...

दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?

ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा...

तू जवळ असतीस तर,


तू जवळ असतीस तर,


कदाचीत स्वप्नांमध्ये जगत नसतो..


पण मग, वास्तवात तरी कुठं जगत असतॊ...


कदाचीत स्वप्न अन वास्तव यांच्यातील दूवा तू असतेस...


जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस....


तू जवळ असतीस तर,कदाचीत एकटाच गुणगूणत नसतो...


पण मग, तुझ्या आवाजात तरी कसा मुरलॊ असतॊ...


कदाचीत माझ्या मनाचा आवाजच तू असतेस...


जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस....


तू जवळ असतीस तर,कदाचीत असा गुमसूम बसत नसतॊ...


पण मग, भानावर तरी कुठं असतॊ...


कदाचीत माझ्या भावनांचा आधारचं तू असतेस...


जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस...


तुझ्या दूराव्याचं कारण मला माहित आहे..


अन तुझ्या आठवणींचं वास्तव्य देखील माझ्याजवळ आहे...


पण तुझ्या वास्तव्यातही तर माझ्याच आठवणी आहेत...


कदाचीत आपल्या आठवणीचं आपलं वास्तव्य आहे...


कारण वस्तव्यात जरी नसलीस तरी,आठवणींत तू माझ्या अन मी तुझ्या जवळ आहे....