आयुष्यातील घटनांचा संदर्भ लावताना
अश्रुच टीपायला लागतात त्यातून सावरताना
ठरवीलेले मनसूबे पुर्ण होतातच असे नाही
तरी ते ठरवीण्याची आपली खोड जात नाही
आपल्या जवळ जे नाही त्याचीच मानवी मनाला ओढ असते
सर्वच मनं सारखी घडत नसतात
म्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते
माज़े काहि चुकत् नव्हते तिचे वागने वावगे नव्हते,
ऐक् मात्र खर् कि बरोबर् कहिच् येत् नव्हते!
तस् पाहिल् तर् निर्जीव् हवा
आलि अन् गेली, पन् जो पर्यन्त् आत् होती
शरीरात् जीवन् फ़ुलवून् गेली!
सगळ्या गोष्टी कशा भराभर घडत गेल्या
मी प्रेमात पडलोय म्हणेपर्यंत
एकाकी कातरवेळा उठवायला आल्या
उगवणारी प्रत्येक सकाळ नवी पालवी फ़ुलवते
मात्र मावळती संध्याकाळ रीतेपणाची चाहुल देते
आज उणे आले आयुष्यात तर
उद्या अधिकही येतील, नेहमीच चुकणारी गणितं
पैकीच्या पैकी मिळवून जातिल!!!
उधाणलेला सागर वादळी वारा,
बुडणारी नाव आणि शांत किनारा!!!
No comments:
Post a Comment