Monday, May 17, 2010

अदृश्य वात्सल्य बापाचे..!!



जयाचे बोट धरून पाहिले पावूल टाकतो , त्यालाच आपण विसरतो.,
आणि लेकराला चालताना पहाणारया आईचेच कौतुक करत बसतो.,
आपल्या जन्माच्या यातना आई सहन करत असते.,
तर बापाची चप्पल मंदिर शोधण्यात झिझात असते.,
एक वेळचे जेवण न घेताच बाप झाल्याचे पेढे वाटतो.,
केवळ पुरुष असला म्हणून आपले अनंदाश्रु गळयातच गिळतो..!!

रक्ताचे पाणी करून लेकराला शालेत घालतो.,
नरकीय परिसस्थितही बाळहट पुरवितो.,
मुलीच्या लग्नापाई नुसत्या भजी पाहून परततो.,
दुरदैव कोणाला शिवू नये म्हणून पावसातच रडतो.,
चुकलोच कधी तर मर-मर मारतो.,
तोच हात रात्रि जेवताना मात्र थर-थर कापतो..!!

सणाला आईला जुनाच शर्ट धुवायला सांगतो.,
नवपना अणन्यासाठी गुपचुप रात्रीच इस्त्री करतो.,
पोराना मात्र कोराच ड्रेस आणतो.,
पर अजारी पडले तर आई काळजीपाई रात्रभर जागते.,
तर बापाला ओवर-टेमला रात्र कमी पड़ते.,
पोर आपल्या पायांवर उभा झाल्यावर मात्र माय-बापाला विसरतो.,
चार दिवसांच्या बायकोच्या पदरात पसरतो.,
आपल्या एशो-आरामत जलम-दात्यालाच विसरतो..!!

ठेच लागल्यावर मात्र तो " आई ग..! " केल्यावाचुन राहणार नाही.,
समोरूनाच साप गेला तर " बाप रे..! " म्हणल्यावाचून राहणार नाही.,
घेतले हजारो जलम जरी ,उपकर या दैवतांचे फेड़ता येणार नाही.,
उद्या आपणही माय-बाप होणार हे विसरून चालणार नाही.,
पाठवलेच वृधाश्रमात नाराधमाने तरी यांची ममता संपणार नाही.,
आपल्या जन्मदात्याचे हल करनारयाला
नरकातसुधा जागा मिळणार नाही.,
नरकातसुधा जागा मिळणार नाही..!!

तिची आठवण ...



सारखी सारखी तिची
एवढी आठवण का येते....?
सतत मनाला क्षणाक्षणाला
का छळत असते....?

रोजच आम्ही भेटत असतो
रोजच आम्ही बोलत असतो...
तरी सुद्धा तिला भेटायला
ओढा माझा हरपल असतो....

तासनतास आम्ही मनमोकळ बोलत असतो
एकमेकांचे सुख दुखः वाटून घेत असतो

एकदा ती सहजच म्हणाली......
मला विसरतोस म्हणूनच तुला आठवण येते.....
त्यावेळेस मी निरुत्तर होतो.....
पण.......

आठवण म्हणजे काय.....?
तिने जाण्याचा विषय काढताच माझ मन अधीर होत
नजरेआड होण्याअगोदर तिला पुनः एकदा भेटू वाटत......
अस का होत नेहमी कि......
नेमक जाण्याच्या अगोदर तिच्या बरोबर भरपूर बोलायचं असत......
बरच काही सांगायचं असत.....

मलाच नाही सांगता येणार काय होतंय ते .....
पण एवढ मात्र खर कि
तिची आठवण मला क्षणाक्षणाला येत असते
सतत मनाला छळत असते.....

चार दिवस प्रेमात..



तिच्या एका होकाराने
पूर्ण जीवन बदलून टाकले
चारच दिवस का होईना
मला तिचे प्रेम मिळाले..
-
सर्वात आनंदाचे क्षण
देऊन गेली ती मला
कळालेच नाही कधी
ती सोडून जात होती मला..
-
मी निस्वार्थी प्रेम केले होते
तिचे सुद्धा खरे असावे
मग असे का घडावे
आनंदाच्या क्षणी दुःख यावे..
-
सर्व तिच्या मनाचे खेळ
माझ्या हाती काहीच नव्हते
तिने खेळलेल्या खेळातील
मी एक साधा प्यादा होतो..
-
तिने सुरु केलेला खेळ
आज तिनेच संपवलाय
मला जिंकणे कठीण नव्हते
पण मी तिच्यासाठी हरलोय..

बायको......




ही जराशी गोंधलेली असते
थोडीशी बेफिकीर ही भासते
मला कधी उशीर झालाय्वर
हिच्या मनाची उलघाल होत असते

मी कितीही नाही म्हणलो तरी
चहात कमी साखर असते
दुपारच्या डब्यात मात्र नक्की
एक पोळी जास्त असते

सकाळी सालस असणारी ही
रात्री तेवडीच खट्याळ असते
दुसरया दिवशी आरशात पाहून
एकटीच गालातल्या गालात हस्ते

हीला काही अवडल तर
लेबल भागून मुरड घालते
माझ्या साठी नेहमी काही ना काही
घ्याचा हट्ट करत असते

माझा पगार किती तोकडा
आहेय हीला जास्त माहित
म्हणून महिना अखेरच्या शर्यतीत
ही नेहमी पहिली असते

तरीच कितीही कोणी भाळल
तरी बायको ही बायकोच असते
बायको ही बायकोच असते

काय असत प्रेमात .....?


काय असत प्रेमात .....? कसली असती हुरहूर...?
कशी असती काळजातली धडधड....? काय मज्जा असते चोरून चोरून भेटण्यात...?
कस वाटत तेच तेच फोनवर तासनतास बोलायला....? काहीच माहिती नव्हत.....

चला एकदा '' TRY '' घ्यावा म्हणून प्रेमात पडायचं ठरवलं....
खोट - खोटच पण तरीही त्यात शिरायचं ठरवलं....मित्रांना फुगवून सांगायचं.....
माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....
आणि एकदाचा तिच्या प्रेमात पडलो.....तिला याची काहीच कल्पना नव्हती...!

आणि मी तसाच विचार करायला लागलो......
हुरहूर.......धडधड.....जे काय असत ते सगळ मिळाल.....!!
मित्रांना फुगवून सांगितलं .....माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....

पण...अचानक दोन - चार दिवस ती मला भेटलीच नाही....
आणि मग माझी मनात कालवाकालव व्हायला सुरु झाली ..
अरे.. हे सगळ खोट -खोट होत मग अस का होतंय.....

मी खोट - खोट म्हणता म्हणता .....
खरच प्रेमात पडलो....अगदी मनापासून ......!!

घरामध्ये बसू वाटत नव्हत......
ऑफिस मध्ये काम करू वाटत नव्हत.....
सतत तिचाच विचार.....
प्रत्येक ठिकाणी तिचाच चेहरा दिसायचा....!

एकट एकट राहू लागलो.....शांत शांत ....गुमसुम राहू लागलो .....
'' दोस्तो कि दोस्ती,यारो कि यारी कम लगने लगी ''हे सुद्धा खर झाल...!!

तिला तर काहीच सांगितलं नव्हत....इकडे माझ्याच मनाचा गोंधळ चालला होता.....
तिला सांगाव म्हणून मी एका संधीची वाट पाहू लागलो......आणि एक दिवशी तिच स्वतःहून माझ्याकडे आली...!

अरे वा......! मी संधीला शोधण्यापेक्षा संधीच माझ्याकडे आली होती...!!
मी जाम खुश झालो......ती आलीच.....पण.....येताना ती तिच्या '' प्रेमाला '' घेवून आली....
खास माझ्या भेटीसाठी......

जखमेवर मीठ चोळतात तसच काहीतरी माझ झाल.....
पण तिला तरी काय दोष देणार..... तिला तरी हे काहीच माहिती नव्हत....
आणि आमच्या प्रेमाची कळी खुलण्याआधीच सुकून गेली....आणि अस म्हणतात कि ......
'' जब दिल तुटता हैं तो उसकी आवाज नही आती....''मी तो आवाज ऐकला......अगदी खरा खरा.........